मयूर घोडे
कवितेत काय असते आणि काय असायला पाहिजे हा प्रश्न अनेक कवींना पडतो ,पण मयूर घोडेला मात्र हा प्रश्न पडत नसावा किंवा पडणार हि नाही,कारण मयूर हा जात्याच कवी आहे ,मनात उमटणाऱ्या भावनांचे चित्रण सरळ आणि सोप्या शब्दात तो कवितेत . करतो,.उगाच शब्दांची आतिषबाजी नाही कि विचारांची सर्कस नाही जे वाटते भावपूर्ण अविष्कारात शब्दांकित करणारी त्याची कविता खरोखर मनाला भावते,
जे विचार ज्या भावना हृदयावर तरंगतात त्यांचे निरागस शब्दांकन मयूरच्या कवितेत उमटते.
कविता हि स्वयंभू असते किंबहुना असावी लागते नाही तर आज मी कविता लिहिणार आहे म्हणून केलीली कविता उपहार गृहातल्या जेवणा सारखे वाटते , पोट भरते पण मन भरत नाही,मयुराची कविता मात्र घरघुती स्वयंपाका सारखी मसाल्यांची चव नसूनही सुग्रास आणि पाचक वाटणारी ,सालस सुगरणीच्या अन्ना सारखी.
कवितेच्या नावाखाली शब्दातले बरेच कागदी ताबूत नाचवले जातात पण भाव नसल्याने ते दिखावटी आणि निर्जीव वाटतात.
कविता हि उपजते कवी मनातल्या भावनांना ती जन्माला घालते ,आणि फक्त शाब्दिक वेणा सरस आणि सकस कवितेला जन्म देऊ शकत नाही .
मयूर हा एक तरुण कवी आहे त्याच्या कवितेत निरागसता आहे ,नवथर भाव आहेत आणि स्वतःच्याच अनुभवाचे मासूम चित्रण आहे, आणि म्हणूनच रसिकाला ते भावते,रानात फुललेल्या मोहाच्या झाडा सारखे वाटते.विचाराची मुळे मनाच्या खोलवर मातीत रुजवणारी कविता .
प्रेमवेडा ,चांदणी .डोहाळे,वाट पोर्णिमा ह्या मयुराच्या कविता सांगतात एका तरुण मनाची कुजबुज जी ऐकाविशीही वाटते आणि आठवण करून देते एका रान फुलाच्या गुच्छ ची जो मोहक आहे आणि सुन्गाधीही आहे आपल्या नवथर प्रेमाची ओळख सांगणारा.मयूरच्या ह्या रानफुलांना मैत्रयाणाचे अनेक आशीर्वाद
शशांक रांगणेकर मुंबई
९८२१४५८६०२
जे विचार ज्या भावना हृदयावर तरंगतात त्यांचे निरागस शब्दांकन मयूरच्या कवितेत उमटते.
कविता हि स्वयंभू असते किंबहुना असावी लागते नाही तर आज मी कविता लिहिणार आहे म्हणून केलीली कविता उपहार गृहातल्या जेवणा सारखे वाटते , पोट भरते पण मन भरत नाही,मयुराची कविता मात्र घरघुती स्वयंपाका सारखी मसाल्यांची चव नसूनही सुग्रास आणि पाचक वाटणारी ,सालस सुगरणीच्या अन्ना सारखी.
कवितेच्या नावाखाली शब्दातले बरेच कागदी ताबूत नाचवले जातात पण भाव नसल्याने ते दिखावटी आणि निर्जीव वाटतात.
कविता हि उपजते कवी मनातल्या भावनांना ती जन्माला घालते ,आणि फक्त शाब्दिक वेणा सरस आणि सकस कवितेला जन्म देऊ शकत नाही .
मयूर हा एक तरुण कवी आहे त्याच्या कवितेत निरागसता आहे ,नवथर भाव आहेत आणि स्वतःच्याच अनुभवाचे मासूम चित्रण आहे, आणि म्हणूनच रसिकाला ते भावते,रानात फुललेल्या मोहाच्या झाडा सारखे वाटते.विचाराची मुळे मनाच्या खोलवर मातीत रुजवणारी कविता .
प्रेमवेडा ,चांदणी .डोहाळे,वाट पोर्णिमा ह्या मयुराच्या कविता सांगतात एका तरुण मनाची कुजबुज जी ऐकाविशीही वाटते आणि आठवण करून देते एका रान फुलाच्या गुच्छ ची जो मोहक आहे आणि सुन्गाधीही आहे आपल्या नवथर प्रेमाची ओळख सांगणारा.मयूरच्या ह्या रानफुलांना मैत्रयाणाचे अनेक आशीर्वाद
शशांक रांगणेकर मुंबई
९८२१४५८६०२