स्मरण गाथा समीर पाठक
स्मरण गाथा समीर पाठक
स्मरणात तू असतेस तू नेहमीच अगम्य ,समीरच्या कवितेतली एक ओळ ,थेंबात तळे दाखवणारी आशय घन कविता,समीरच्या कवितेत कल्पनेचे उंचच उंच झोके दिसतात ,आठवणी आणि स्मरण ह्या दोन शब्दातले भावांतर ,समीरने अगदी बोलके केले आहे,नश्वर पासून ईश्वरा पर्यंतची उंची गाठणारी एक फक्त दोन ओळींची कविता,आठवणीतले येणे जाणे नेहीमीच असते ,पण स्मरणात तू अगम्य म्हणत मन आणि हृदय यातील फरक दाखवणारी कविता .फक्त दोन ओळींची ,मंत्र सारखी लहान असूनही महान ठरणारी.
समीरची कविता वास्तवाची धग नेहमीच जागती ठेवत कल्पनेचे पंख लाऊन हि वास्तवाच्या मातीतच आपल्या पावलांच्या रमल खुणा उमटवते"..
असेल कोणीतरी एखाद्या वळणावर हीही अशीच प्रेमाच्या नावाची शोध घेणारी कविता ,कोणीतरी केवळ आपल्यासाठीच आहे ह्याचा शोध घेणारी प्रथम पुरुषी एक वचनी कविता ,त्याच्यावर प्रेम करणाऱ्या ,त्याचे एकाकी पण संपवणाऱ्या कुणाचा तरी शोध घेणारी ,आणि तारुण्य सुलभ भावनांची शाई कागदावर शिंपडाव णारी एक नवथर कविता.,शब्दांची फुले नाजूक पणे गुंफणारी कविता.
कविता हे एक प्रभावी साधन आहे मनातल्या भल्या बुऱ्या साऱ्याच भावनांना प्रगट करण्याचे ,आपल्या साऱ्या कविता केवळ कागदी कपटे नव्हते कधीना कधी जिच्यासाठी त्या आहेत तिला त्या नक्कीच उमगतील ह्याची दुर्दम्य आशा बाळगणारी समीरची आशा लवकरच पुरी व्हावी हि ईश चरणी प्रार्थना.नाजूक शब्दांचे बिलोरी आरस्पानी रूप घेऊन फुलणारी समीरची कविता अशीच फुलो असे मैत्रायानाचे सप्रेम आशीर्वाद.
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२
स्मरणात तू असतेस तू नेहमीच अगम्य ,समीरच्या कवितेतली एक ओळ ,थेंबात तळे दाखवणारी आशय घन कविता,समीरच्या कवितेत कल्पनेचे उंचच उंच झोके दिसतात ,आठवणी आणि स्मरण ह्या दोन शब्दातले भावांतर ,समीरने अगदी बोलके केले आहे,नश्वर पासून ईश्वरा पर्यंतची उंची गाठणारी एक फक्त दोन ओळींची कविता,आठवणीतले येणे जाणे नेहीमीच असते ,पण स्मरणात तू अगम्य म्हणत मन आणि हृदय यातील फरक दाखवणारी कविता .फक्त दोन ओळींची ,मंत्र सारखी लहान असूनही महान ठरणारी.
समीरची कविता वास्तवाची धग नेहमीच जागती ठेवत कल्पनेचे पंख लाऊन हि वास्तवाच्या मातीतच आपल्या पावलांच्या रमल खुणा उमटवते"..
असेल कोणीतरी एखाद्या वळणावर हीही अशीच प्रेमाच्या नावाची शोध घेणारी कविता ,कोणीतरी केवळ आपल्यासाठीच आहे ह्याचा शोध घेणारी प्रथम पुरुषी एक वचनी कविता ,त्याच्यावर प्रेम करणाऱ्या ,त्याचे एकाकी पण संपवणाऱ्या कुणाचा तरी शोध घेणारी ,आणि तारुण्य सुलभ भावनांची शाई कागदावर शिंपडाव णारी एक नवथर कविता.,शब्दांची फुले नाजूक पणे गुंफणारी कविता.
कविता हे एक प्रभावी साधन आहे मनातल्या भल्या बुऱ्या साऱ्याच भावनांना प्रगट करण्याचे ,आपल्या साऱ्या कविता केवळ कागदी कपटे नव्हते कधीना कधी जिच्यासाठी त्या आहेत तिला त्या नक्कीच उमगतील ह्याची दुर्दम्य आशा बाळगणारी समीरची आशा लवकरच पुरी व्हावी हि ईश चरणी प्रार्थना.नाजूक शब्दांचे बिलोरी आरस्पानी रूप घेऊन फुलणारी समीरची कविता अशीच फुलो असे मैत्रायानाचे सप्रेम आशीर्वाद.
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२
12'11.14
Subscribe to:Post Comments (Atom)
No comments: