Translate

शुक्रवार, ८ मे, २०१५

एक कैलासवासी पार्ले .


                                                    .एक कैलासवासी पार्ले
                                                .......................;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
                                                             

काही वर्षांपूर्वी ऐकलेल्या  एका प्रहसनाचे नाव अजूनही मनाच्या  सां दि कोपऱ्यातून बाहेर पडतच नाही ,अजूनही घट्ट दडी मारून बसले आहे .कदाचित त्या अनामिक लेखकाची आणि माझ्या दुक्खचि सल एकच असावी.
माझा जन्म शिवाजी पार्क दादरचा आणि माझे शालेय शिक्षण  माझ्या आजोळी "दादांच्या बालमोहन विद्यामंदिर मध्ये झाले.आमच्या शाळेचा उल्लेख दादांची बालमोहन असाच होत होता आमचे दादा आणि आमची शाळा हि एकमेकांची अविभाज अंगे होती शाळेचा उल्लेख "दादांची बालमोहन असाच होत असे ,आजही शाळेचे नाव सांगताना "दादांची बाल मोहन विद्यामंदिर"असेच शब्द उमटतात ,गुरूंच्या नावांचे  इतके ठसठशीत मळवट भरलेले  गुरुकुल आम्हाला लाभले हे आमचे सदभाग्य ,त्यांचे प्रेम आणि आपुलकी आठवली कि अजूनही मन गहिवरते.खरोखर तसे प्रेम करणे आजच्या कुठल्याही "ज्ञान महार्षीला जमाने नाही हेच खरे.त्याकाळी शिवाजी पार्कला ग्यास्चे दिवे होते हातात सहा पुरुष लांबीची काठी घेतलेला महापालेचा एक कर्मचारी संध्याकाळ झाली कि एकेक करत दिवे पेटवत जायचा ,त्या दिव्यांच्या मंद प्रकाशात आसमंत उजळून जायचा , दादांच्या आठवणीने आजही मनाचा कोपरा  उजळतो ,आजोळी आजी आजोबांच्या आणि मामा मावश्यांच्या अनुभवलेल्या प्रेमाची चव अजूनही अवीट वाटते.
माझे बालपण जसे दादरला गेले तसेच दर शनिवारी संध्याकाळ  ते सोमवार सकाळ माझ्या आई वडलांच्या घरी विले पार्ल्याला जात असे.शिवाजी पार्क आणि विले पार्ल्यातल्या नरिमन रोड वरच्या रांगणेकर वाडीतही जात होता ,,दुहेरी निष्ठेला तेव्हा कुठलाही अटकाव नव्हता.
बालपणातले दिवस सुखाने जात होते ,धावपळ ,घाई हे शब्द जणू आमच्या साठी नव्हतेच ,खेळणे ,खाणे आणि हुंदडणे ह्या शिवाय आम्हाला काहीही माहित नसायछोटी छोटी कौलारू घरे हे पार्ल्याचे वैय्शिष्ट होते .बहुतेक सर्व घरे एक मालकांची आणि त्यांच्या बरोबर राहणाऱ्या एकाथावा दोन भादेकारुणा गुण्या गोविन्द्याने सांभाळून राहत असत.काही काही चाली वजा वाड्यात मालक आणि चारपाच भाडेकरू राहत असत.घराच्या भिंती केवळ मोठ्यांसाठी असत मुलांना त्या दिसतही नसत.
पार्ले टिळक विद्यालय,टिळक मंदिर ,पार्लेश्वाराचे मंदिर , गोखल्यांचे राममंदिर,शान्भागांचे मद्रासी राम  मंदिर,कुंकू वाडीतले हनुमान मंदिर,हि हि पार्ले करांची आद्य श्रद्धास्थाने.
 पार्लेश्वर हे पार्ल्याचे प्रमुख देवस्थान आणि श्रद्धास्थान ,कमीतकमी एकदातरी पार्लेश्वाराला हात जोडल्याशिवाय पर्लेकारांचा दिवस जात नसे ,लेले गुरुजी हे  तेथील प्रमुख गुरुजी ,पर्लेश्वारावर श्रद्धा नसलेला पार्लेकर विरळाच .रार्ह्त्रीय सेवा संघाचे शाखा पर्लेश्वराच्या लगतच्या इमारतीत चालत असे.
प्रत्येक देवस्थानाचे ठराविक उत्सव  पारंपारिक पद्धतीने साजरे केले जात    ,गोखल्यांच्या राम मंदिरात ,रामनवमीला सुंठवडा मिळत असे,मद्रासी  राम मंदिरात चैत्री नवरात्रीला भोजन  प्रसादाचा लाभ समस्त पार्लेकर घेत असत,त्या नंतर संपन्न होणारी रथयात्रा फारच देखणी असे.बहुतेक प्रत्येक घरातून नारळ वाहिला जात असे,प्रामुक्ख्याने ह्या रथयात्रेचे नेतृत्व शानभाग घराण्याकडे असे ,प्रसाद म्हणून परत दिलेल्या अर्ध्या नारळात लावलेल्या गंधाचा प्रासादिक आणि पवित्र सुवास अजूनही माझ्या मनात दरवळतो आहे ,मोठाल्या भांड्यात बनवलेले मिरी,गुळ आणि वेलची मिश्रित पेय "पानक"ह्या नावाने दिले जात असे.ह्या घराण्यातील एक पुरुष डोक्यावर रामाची मूर्ती घेऊन मंगलोरहून पार्ल्यात आले आणि त्यांनी ह्या राम मंदिराची स्थापना केली.त्यांना कवडीवाले बुवा ह्या नावाने समस्त पार्लेकर ओळखत,आणि त्यांच्या मंदिराला मद्रासी राम ह्या नावाने ओळखले ओळखले जायचे.
गोखल्यांचा राम मात्र पूर्णतः मराठी होता. खरे गुरुजी हे गोखले राममंदिराचे पुजारी होते.
सुभाष रोड वर खोसला घराण्याची एक खोसला निवास  नावाची  सुंदर इमारत आहे  तिच्या अग्रभागी एक श्री कृष्णाची एक देखणी मूर्ती आहे  ,दर गोकुळ अष्टमीला केशराचे सरबत प्रसाद म्हणून दिले जात होते.
पार्ले टिळक विद्यालय हा पार्ल्याचा मानबिंदू  होता,शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन  अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरे होत होते,शिक्षक मंडळी आणि विद्यार्थी ह्या साठी भरपूर मेहनत घेत.आणि संमेलन नीटपणे पार पडलेकी शिक्षक मंडळींच्या  चेहऱ्यावर समाधानाची पावती दिसत असे.,सर्वश्री पेंढारकर ,भाऊ भागवत,बाबुताई रोडे,..कुलकर्णी ,सहस्त्रबुद्धे ,ह्या शिक्षक मंडळीनी पार्ले घडवले ,पार्ले टिळक मध्ये शिकलेल्या एकाच विद्यार्थ्याचे नाव सांगितले तर तेव्हाशालेने काय आणि कोण घडवले ह्याची पुरेशी ओळख होईल ते नाव म्हणजे पु  .पुलंच्या नवा पुढे स्वर्गीय हा शब्द लावायची हिम्मत मला होत नाही पु  स्वर्गात वगैरे कुठेही गेले नाहीत ते अजूनही आमच्यातच आहेत.
पूल ना पर्ल्याने घडवले आणि त्यांनी पार्ल्याला अजरामर केले.
लोकमान्य सेवासंघ हे पुलांचे श्रद्धास्थान ,पुलांचे  आजोबा ती.वामनराव दुभाषी हे पार्ल्यातल्या सारस्वत समाजाचे एक आदरणीय गृहस्थ होते ,प्रार्थना समाज रोड आणि अजमल रोड  ह्या परिसरात दुभाषी,देशपांडे,भेंडे फडणीस हि सारस्वत मंडळी राहत होती.दर.नेवरेकर,वाघ ,पाखाडे धुरंधर,रानडे हि काही तत्कालीन पार्लेकर मंडळी.
अण्णा साठे हे समस्त पार्लेकारांचे लाडके व्यक्तिमत्व त्यांच्या "विजय स्टोर्स "ह्या दुकानात उत्तम माल मिळतो ,चोख व्यवहार उत्तम माल हे त्यांचे  ब्रीद वाक्यच ,आणि ते अंमलातहि आणले  जायचे.अण्णा पार्ल्याच्या   सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या नेहमीच अग्रभागी असत.अण्णाच्या मिठाला पार्लेकर कायमचे जागले.अण्णाचे पार्ले  पार्लेकारांवारचे वरचे प्रेम केवळ अतूट.
श्री.सुमंत जोशी हे एक तत्कालीन बहुश्रुत व्यक्तिमत्व.ते दैनिक नवशक्तीत उपसंपादक होते,टिळक मंदिर रोडच्या कोपऱ्यावर त्यांचा "यश्मुना"नावाचा बंगला होता,ग्यालरीत बसलेले सुमान्त्जी सायंप्रकाशात एखाद्या ऋषी सारखे भासत.  पर्लेकारांचा पिंडच कलावंताचा होता ,लोकमान्य  सेवासंघाने सोज्वळ आणि संपन्न अदाकारी पार्लेकाराना शिकवली ,अनेक गायक गायिकांना घडवले नावारूपास आणले,दत्ता जोगदंड,लालजी देसाई ,..जयवंत कुलकर्णी .....नीला भिडे सारख्या उदयोन्मुख कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप नेहमीच मारली.
छोटसे असे हे उपनगर काही वर्षापूर्वी फार टुमदार होते ,बहुतेक वस्त्यांना अमक्याची  वाडी तमक्याची वाडी ह्या नावाने ओळखले जायचे,पार्ले स्टेशन वरचे मद्रास क्याफे हे माझ्या माहितीतले सर्वात जुने उपहारगृह .मागून आप्पा  जोगळेकरांनी गणपतीच्या सुबक मुर्त्या आणि मोदक दोनीही पार्ल्याला पुरवले.
पार्ले बिस्कीट कंपनी हे पार्ल्याचे सुगंधी गुपित.सर्व  जगभर प्रसिद्ध असलेली हि बिस्कीट कंपनी आपले अस्तित्व सुगंधाने पार्ल्याचे वातावरण सुगंधित करत होती..
पार्ल्याच्या फाटकाजवळ बहुसंख्य ख्रिस्ती लाल रंगाच्या  बांधवांची वस्ती होती.बरचसे ख्रिस्ती वसईकर ख्रिस्ती होते ,छोट्या छोट्या   वाड्यात ,बागायती करणे,
आणि पार्ले मार्केटात ते विकणे हा त्यांचे  रोजचे काम असे पार्ल्यात मिळणारी ताजी पालेभाजी,भेंडे,दोडकी पडवळ सारख्या भाज्यांचा पुरवठा ह्या मंडळीने पार्ल्याला वर्षानुवर्षे केला.
सणासुदीला आंब्याचे पान,भाताच्या ओम्ब्या आणि गावठी झेंडू हाताने गुंफून बनवलेली तोरणे हि ह्या समाजाने समस्त पार्लेकरांना वर्षानुवर्षे पुरवलीलाल रंगाच्या चॊकदिच्य नउवारी साडी नेसलेल्या ख्रिस्ती भगिनी पार्ले मार्केटात बहुसंख्येने दिसायच्या.पाणथळ भागात बागायतीचे काम करणाऱ्या ह्या मंडळीना हत्ती रोगाची लागण झालेली दिसायची ,त्या पायांना जळवा लावणे हा एक खात्रीचा उपाय मानला जात होता.
बहुतक पार्लेकारांचा प्रवास सुमित्राबाई वाघ,अथवा टिळक प्रसूती गृहात सुरवात होऊन वाघाजी भाई ह्यांच्या हिंदू स्मशान भूमीत संपत असे.
पार्लेकर हा परवलीचा शब्द होता ,पर्ल्याबद्दल इतर मुंबई करांना नेहमीच कुतुहूल वाटत असे फक्त पार्ले कर ह्या नावाखाली अनेक प्रांतांचे समाजाचे लोक एकसंघ कसे होतात हे  सुटणारे कोडे होते.
पार्ल्याला एअर  पोर्ट आला आणी इतर उपनगरांच्या मानाने पार्ल्यातल्या जमिनीचे  भाव वाढत चालले ,ते हनुमानाच्या शेपटाप्रमाणे आजही वाढत आहेत ,पार्ल्यातल्या अनेक लोकांनी आपल्या जागा विकून दोम्बाविलीला स्थलांतर केले.पार्ल्यात डोंबिवली फास्टची  सुरवात झाली.कित्येक वर्षे एकमेकांशी गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या मालक आणि भाडेकरून मध्ये भिंती उभ्या राहल्या ,उंच इमारतींचे जंगल  उभे राहिले ,बराचश्या वाड्या नामशेष झाल्या आणी त्या बरोबर पार्लेकर हि हरवला,झाडांच्ची आणी माणुसकीची हिरवळ सुकली.उंच उंच इमारतींच्या ओझ्याखाली माझे जुने लाडके पार्ले कैलासवासी झाले .



समाधान

चिरंजीव अजय,
तुझ्या वाल वरचे भावलेले एक वाक्य doing very good.. beyond my expectations !!! Tell your's.. how r u doing? :)समाधान हि एक प्रकारची योग साधनाच आहे दुध तापवल्या नंतर आणि निवल्यावर जशी साय साचते तसे परिश्रमाचे चटके खाऊन आता समाधानाची साय पसरली आहे,i m a simple & straight forward person with a little inclination towards spirituality.
 हे तुझ्या वाल वरचे वाक्य शत प्रतिशत सत्य आहे ज्याला समाधान गवसले त्याला आत्मा गवसला ,आत्मज्ञान प्राप्त झाले,तुझ्यासारख्या समाधानी  डॉक्टर ने पाणी दिले तरी त्याला औषधाचे गुण प्राप्त होतील.समाधानाचे उद्गार हि देवाला त्यांनी सुखी ठेवलाय असे सांगणारी एक पावतीच."औषधं जान्हवी तोयं वैद्यो नारायणं हरी "
शशांक रांगणेकर

गुरुवार, ३० एप्रिल, २०१५

शशांक केतकर



आज आकाशात बरेचसे ढग दाटून आले आहेत ,तृषार्त चातका प्रमाणे सर्व जण पावसाची वाट पाहताहेत ,फेस बुक हि आमची खिडकी झाली आहे ,ह्या खिडकी तून बाहेरचे वारे येतात आणि जगात काय चालले आहे आहे ह्याची जाणीव करून देतात. म्हंटला बघूया फेस बुक वरचा पाऊस काय म्हणतोय .सर्फ करता करता एका कलाकाराचे प्रोफाईल नजरेत पडले ,शशांक केतकर ह्याचे आणि नावात साम्य असल्याने ते पूर्णपणे पाहण्याचा मोहही आवरला नाही.

एक अतिशय सुंदर आणि सोप्प्या शब्दात गुंफलेले चारच ओळींची कविता होती,"बोलले मेघ हे सारे अन बोलले थेंब रे ...........
अतिशय तरल शब्दात पावसाच्या चाहुलीची भावपूर्ण कुजबुज सांगणारी हि कविता मनापासून भावली.
प्रोफाईल ची सफर चालूच होती ,आणि तिळा उघड म्हणताच उघडणारी अलिबाबा ची गुहा उघडली.
केवळ चकचकीत चेहरा असलेला हा रंगकर्मी नाही तर सामाजिक संवेदानाचे भान ठेवणारा ,मनात कविता जपणारा आणि फुलवणारा एक संवादशील कलाकार आहे.
चेहऱ्यावर चमकणारे बुद्धिमत्तेचे तेज आणि डोळ्यात ओथंबणारे माणुसकीचे मेघ.आणि प्रसन्ना व्यक्तिमत्वाचे गुलाबी वलय. छोट्या पडद्यावरचे एक मोठे उदयोन्मुख आगमन.
मी सहसा मालिका बघत नाही कारण त्यात दिसणाऱ्या व्यक्ती मला अनोळखी वाटतात ,चांगुलपणा आणि दुष्टपणा ह्याची सीमा गाठणारी व्यक्तिमत्व अजूनतरी परमेश्वर कृपेने माझ्या भेटीला आलेली नाहीत. पण शशांक काम करत असेलेली सिरीयल थोडा वेळका होईना त्याच्या उपस्तिथी मुले सुसह्य वाटते. एक संयत अभिनयाचे दर्शन होते.

शशांक ने अभिमानाने आपण जोपासलेल्या झाडाच्या आंब्याचे फोटो भिंतीवर टाकले आहेत.मातीशी नाते सांगणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व सिरीयल च्या कचकडी जगात राहूनही स्वतःच्या श्रमाने मोहरणारे अनोखे रूप.

ज्ञान कोशकार केतकर महाराष्ट्रातले एक धीमंत व्यक्तिमत्व ,शशांक हि त्या बुद्धीचा वारसा ठेऊनच आहे.सेलिब्रेटी आणि त्यांचे समाजकार्य ह्यावरचे त्याचे भाष्य त्याच्या निरक्षण क्षमता आणि अचूक भाष्य हे ह्याची ठळक ओळख देतात.
शशांक एक लोकप्रिय कलाकार आहे ,पण तरीही त्याच्या कला गुणांना पुरेसा वाव मिळत नाही आहे हि खंत मनात कुठेतरी सालात राहते ,कदाचित त्याचे व्यक्तिमत्व पेलवेल अश्या भूमिका सिरीयल निर्मात्यांकडे नसाव्यात का.अभिनय उच्चारण आणि प्रसन्ना व्यक्तिमत्व लाभलेल्या ह्या गुणी कलाकार ह्या छोट्या पडद्याला पेलवत नाही कि उमगत हेच नाही कळत .
नाही.
शशांकाचे पूर्ण प्रोफाईल मी पहिले आनंद वाटला मराठी कलाक्षेत्राला एक सुसंस्कृत बुद्धिमान लोभस आणि तेजस्वी वाक्तीमात्वा नियती भेट म्हणून देते आहे आणि छोट्या पडद्यावरच्या बड्या बुजुर्गांनी ह्या नावागाताच्या दैवी देणगीचा लाभ घेऊन त्याला आणि ह्या छोट्या पडद्यालाही मोठे बनवावे सर्वार्थाने.
मनात डोकावणारा एक अनाहूत विचार "मी ह्या व्यक्तीला ओळखतही नाही तरीही मला ह्याच्या बद्दल चार शब्द लिहावेसे का वाटले उत्तर आले ते दैवी गुण बुद्धीचे रूपाचे आणि माणुसकीचे त्यांना तू पूर्ण ओळखतोस ना ते ह्याचात दिसले आणि त्यंनी घातलेल्या सादेचा हा प्रतिसाद असावा आणि काय.
शशांक शिरीष केतकर ह्या व्यक्तीलाच नव्हे तर व्यक्तिमत्वाला मैत्रायाणाच्या हार्दिक शुभेच्छा
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

गुरुवार, २ एप्रिल, २०१५

बोलती पुस्तके



                                                       बोलती पुस्तके

आनंद वर्तक बोलती पुस्तके ह्या एका अभियानाचे प्रणेते ,आनंदाचे ह्याबद्दल जेवढे करावे तवढे कौतुक थोडेच आहे ,रामदास पाध्यांनी बाहुल्यांना बोलते केले आणि मराठी  कला जगात एक वेगळीच सुरवात झाली ,आवडाबाई आणि  अर्धवट राव मराठी मनाला हसवून गेले ,त्यांची ओळख मराठी मनात अजूनही ताजी आहे आता तर आनंद यांनी पुस्तकांनाच बोलते केले  आहे ,वाचा आणि लिहा ह्याबरोबर ऐका आणि समजा  हा एक वेगळा संदेश दिला आहे, आजच्या तरुणाईला वाचायला नको पण ऐकायला आवडते मग घ्या हे बोलते पुस्तक अगदी डोळे मिटून मिटून एका तुमचे डोळे उघडतील ,ह्यातल्या पुस्तकांची निवड आनंदाचा मराठी साहित्याचा व्यासंग किती दांडगा आहे ह्याची ओळख देते .सर्व प्रकारचे लेखन ह्यात समाविष्ट केले आहे ,अभ्यास अचूक पारख आणि जन मनसावरची  पकड ह्याशिवाय हा प्रयोग सफळ  होणे शक्य नाही ,आनंद चे काम फार मोठे आहे बहु आयामी व्यासंग हे बहुश्रुत ज्ञानार्जानाने साध्य  होते ,.

भारतीय संस्कृती श्रुती आणि श्रुतीची संस्कृती आहे ,श्रुती  म्हणजे एकणे  आणि स्मृती म्हणजे स्मरणात ठेवणे हा साधा आणि सोपा अर्थ ह्या उपक्रमांनी सफल केला आहे. तुक्याचे अभंग,नामदेवाचे अभंग ,अनेक संत कवींचे साहित्य अमर केले ते सर्वसामान्यांच्या श्रुतीने आणि स्मृतीने ,जनीच्या विठ्ठल प्रेमाचा लडिवाळ अविष्कार आजही जनसामान्यांना अनुभवता येतो तेही ह्याच श्रुती आणि स्मृतीने ,डफावर ची थाप ऐकून  अंगातले रक्त सळसळते आणि शिवरायाची आठवण जागते आणि हात   नकळत मुजरा करतात ,एकतारीचे  स्वर आणि सूर देवघर उभे करते आणि मनासज्जनाचे घोष समर्थ रामदासांचे तेजस्वी स्वरूप जागवते ते ह्याच श्रुती आणि स्मृतीने ,जे कानावर पडते ते मनाचा  ठाव घेते आणि अमर्त्य होते कारण मन कधीही मरत नाही ,वारसा हक्काने पुढच्या पिढी कडे ते जाते ,आमच्या आई बाबांनी ,आजी आजोबांनी काका मामांनी शेजाऱ्या  पाजाऱ्यांनी  ते मन आम्हाला दिले ,पण आम्ही पुढचा पिढीला काय देऊ ?काहीही नाही कारण आमच्याकडे बोलायला वेळ नाही आणि त्यांच्याकडे वाचायला वेळ नाही मग  यावर तोडगा काय? ,"हि आनंदाची बोलती पुस्तके "स्वतः बोलणारी आणि तुम्हा आम्हाला सर्वांना विचार करायला लावणारी ,विचार करू नकात  वेळ हि डाउनलोड  करा ,पण ती करता करता आनंदाला शुभेच्छा धन्यवाद द्यायला विसरू नकात नाहीतर ती कृतघ्नता  ठरेल . 
आनंद  तुला आणि तुझ्या ह्या महान कार्याला अभिष्ट  चिंतून  हा लेख संपवतो .

शशांक रांगणेकर ९८२१४५८६०२ 

बुधवार, १ एप्रिल, २०१५

सुनील अग्रेसर



सुनील अग्रेसर

 कदाचित आजच्या पिढीला माहित हि नसेल ,
आमच्या लहानपणी एक घरघुती क्यालीडोस्कोप यायचा,नळीत तीन काचेच्या आरशाच्या त्रिकोणी आकाराच्या पिऱ्यामिड मध्ये काचेच्या रंगी बेरंगी बांगड्यांचे तुकडे घातलेले असत आणि त्यांचे प्रतिबिंब  काचेच्या पडद्यावर दिसत असे ,रंगी बेरंगी ती प्रतिबिंबे आम्हा मुलांना फार आवडत तांस तास ते बघत राहणं हा माझ्या बालपणीच्या सर्व मुलांचा एक लाडका खेळ होता ,त्यात सर्वात मजेची गोष्ट म्हणजे एकदा दिसणारी रंगीत आकृती चित्र परत आकाराला येत नसे ,दर वेळेला एक वेगळीच आकृती दिसे आणि किंमत फार तर आठ आणे अथवा रुपया ,अर्थात त्यावेळी रुपयाही किंमत होती .

आता आयुष्याच्या संध्याकाळी असाच एक कालीदोस्कॉपे बघायला मिळतोय नाव "सुनील अग्रेसर",कलेच्या च्या सर्व क्षेत्रात आपला सुनील ठसा उमटवणारा हा सुनील अग्रेसर खरोखर सर्वार्थाने अग्रेसर आहे ,अभिनय ,  दिग्दर्शन ,निर्मिती ह्या सर्व क्षेत्रात ठसा उमटवणारे बरेच प्रतिथ यश माझ्यापाहण्यात आहेत पण त्या यशाबरोबर सहृदय तेचे परोपकारी गुण विशेष मात्र ह्याच्या कडे आहेत.
नवागतांसाठी सिनेमा क्षेत्राच्या मायानगरीत एक विश्वासू मार्गदर्शकाचे व्रत अचारणारा सुनील हा जेव्हडा मोठा कलाकार त्याही पेक्षा मोठा माणूस आहे ,त्याचे व्रताच माणुसकीचे आहे मायानगरीत  नवागात प्रवेशणाऱ्याचे मनापासून "योग क्षेमं वहाम्यहम"म्हणत आपल्या अनुभवाचे भांडार सर्वांसाठी मुक्त कर णाऱ्या सुनील ला  मैत्रायण चा मानाचा मुजरा


शशांक रांगणेकर मुंबई ९८२१४५८६०२

मंगळवार, १० मार्च, २०१५

सलिल कुलकर्णी

                              सलिल कुलकर्णी
सलिल कुलकर्णी ,हे नाव तुम्हाला माहीतच आहे ,"आयुष्यावर बोलू काही "माहित नसलेला सुजाण चोखंदळ रसिक मलातरी माहित नाही ,रविकिरण मंडळाच्या कवींचा काव्यगायनाचा उपक्रम परत एकदा "आयुष्यावर बोलू काही "ह्या आपल्या कार्यक्रमाद्वारे  पुनर्जीवित  करणारा एक संगीत वेडा तरुण . सलील आणि संदीप ह्यांनी मराठी रसिकाच्या सुख दुक्खाच्या रमल खुणांना भावगर्भ शब्दात गुंफले  आणि  संगीतिकेच्यारूपाने रंग मंचावर आणले . सामान्य माणसाच्या  भाषेत बोलत बोलत असामान्यत्व  प्राप्त झालेली  हि जोडगोळी मराठी  जन मानसात  एक  अढळ स्थान मिळवून आहेत .

सलीलला संगीतकार म्हणून मराठी माणूस ओळखतो ,सभ्य भाषेत कसलेही अंग विक्षेप नकरता ,केवळ आपल्या सुरेल गाण्याने  रसिकांच्या मनावर आणि कानावरही लीलया ताबा मिळवणारा  हा तरुण केवळ कवी अथवा गायकच नाही तर हाडाचा विचारवंत आहे .चहाड्या  चुगल्या दुसऱ्याचे   चरीत्र्यहनन  ,समकालीन कलावंताबद्दल वाटणारी असूया ,ह्या दुर्गुणा  पासून दूर राहणारा हा कलाकार जेव्ह्हा त्याच्या " सलील अन्प्ल्गड" ह्या दैनिक लोकसत्ता मधील सदरात लिहितो तेव्हा कळते कि ह्या तरुणाला फक्त सुरेल आणि सुगम गाणेच येते असे नाही तर लिहिणेही येते.

रंगभूमीवरच्या मग ती कुठल्याही पडद्यावरची असो कलाकारांबद्दल प्रवाद उठवले जातात ,चेहर्याचा रंग पुसल्यानंतर आणि पुसला नसतानाही ती आपल्या सारखीच सामान्य माणसे आहेत .फ़क्त त्यांच्यातील  कलागुणांनी त्यांना असामान्यत्व  बहाल केले आहे हे बरचसे लोक विसरतात ,त्यात भर पडते  काही वाचाळ  वीरांची,सर्व कलावंताची असलेली आणि नसलेली लफडी कुलंगडी केवळ आपल्याच साक्षीने घडतात आणि त्या सर्वाचे आपण एकमेव साक्षीदार आहोत असे समजणारे आणि  अफवा पसरवणारे  समूह म्हणजे भिशी ग्रुप ,,कट्ट्यावरची मंडळी ,चटोर तथाकथित पत्रकार ,आणि कितीतरी .... सामाजिक प्रदूषण करणाऱ्या  आसुरी प्रव्वृत्तीवर शब्दांचे आसूड जेव्हा सलिल ओढतो तेव्हा वाटते सलिल :स्वच्छ भारत अभियान "ह्या शासकिय  अभियानाचा  तू अशासकीय आणि प्रभावी पुरस्कर्ता आहेस. ज्या शब्दांचे वळ दिसत नाही त्याची  कळ  जाणवते . काही लोकाच्या बेताल आणि मुर्ख बडबडीला कुठेतरी लगाम बसलाच पाहिजे ,आणि तुझे बोचरया  पण सभ्यपणाच्या लक्षमण रेषेला न ओलांडता    लेख  हे खऱ्या अर्थाने समाजप्रबोधन करतात .

सलील तुझ्या  चेहऱ्यावरचे चांदण्यासारखे  स्वच्छ हास्य हि तुझ्या मनातल्या विचारांचे  एक परमेश्वरीय  प्रसाद चिन्ह आहे ,आणि  त्यावरच मराठी रसिक भाळतो ,आणि त्याला वाटते हा कुलकर्ण्यांचा सलिल आमचाही आहे  हि आपुलकी कवच कुंडलासारखी  सांभाळेल .
असाच लिहित जा गात जा त्या लिहिण्यावर त्या गाण्यावर न जाणो कित्त्येक खुलतील  फ़ुलतिल.

शशांक रांगणेकर  
९८२१४५८६०२